सिडनी येथे सुरु असलेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंवर झालेल्या वर्णद्वेषी टिप्पणीवरुन विराट कोहलीने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
- सिडनी क्रिकेट मैदानावर भारतीय संघातील खेळाडूंवर केलेल्या वांशिक टीका झाली
- याबाबद कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली आहे
- त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे
- भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या तिसर्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वांशिक भाष्य केलं होतं
- कोहलीने ट्विट केले की, “वर्णद्वेषी टिप्पणी अजिबात मान्य नाही’
- ‘सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना अशा अनेक अनुभवानंतर मी असे म्हणू शकतो की ते सहनशीलतेच्या बाहेर आहे. मैदानावर हे पाहणे फार वाईट आहे.”
- ‘या घटनेचा गांभीर्याने विचार करायला हवा आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे’
- ‘जेणेकरून पुढे अशा घटना होणार नाहीत’